करोनाच्या साथीबरोबरच राज्यात घडत असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या भाषणाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. लाइव्ह अपडेट्स: >> >> पूर्व विदर्भातील जनतेनं काळजी करू नये. सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल - उद्धव ठाकरे >> निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना ७०० कोटी रुपयांची मदत आपण केलीय. केंद्राच्या पथकानंही याचं कौतुक केलंय - उद्धव ठाकरे >> असं कोणतंही क्षेत्र नाही जिथं सरकार म्हणून आपण काम केलं नाही - उद्धव ठाकरे >> रुग्णांवरील उपचारांसाठी राज्यात ३ लाख ६० हजार बेड गेल्या चार-पाच महिन्यांत वाढवले आहेत - उद्धव ठाकरे >> आदिवासींसाठी असलेली खावटी अनुदान योजना पुन्हा सुरू केली आहे. पावणे दोन कोटी शिवभोजन थाळ्यांचं वितरण झालंय - मुख्यमंत्री >> विक्रमी कापूस खरेदी केली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभं आहे - मुख्यमंत्री >> महाराष्ट्रातील २९.५० लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंय; मुख्यमंत्र्यांचा दावा >> मुंबईत लोकांच्या वर्तनात बरीच शिथिलता दिसतेय. ते बरं नाही - मुख्यमंत्री >> परदेशात सगळं काही खुलं झालंय पण नियम-कायदे कठोर आहेत हे लक्षात घ्यायला हवं - मुख्यमंत्री >> लोक एकटे असताना मास्क घालतात आणि मित्रांशी बोलताना मास्क काढतात हे योग्य नाही - मुख्यमंत्री >> पुन्हा लॉकडाऊन करायची वेळ येऊ नये याची काळजी घ्या - मुख्यमंत्री >> करोना विरुद्धच्या नव्या मोहिमेत सर्वांचा सहभाग गरजेचा आहे - मुख्यमंत्री >> 'घराबाहेर पडा' असा सल्ला मला देणाऱ्यांना मी सांगतो की ते गेले नाहीत, त्या दुर्गम भागात मी व्हिडिओद्वारे पोहोचतोय, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला >> दुकानातील वस्तूंना कारण नसताना स्पर्श करू नका - उद्धव ठाकरे >> इतर व्यक्तींशी बोलताना 'फेस टू फेस' बोलण्याचं टाळा. ऑनलाइन खरेदीवर भर द्या - उद्धव ठाकरे >> सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला. बाहेरून आल्यानंतर कुटुंबात प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्या - ठाकरे >> व्हायरस पोहोचण्याआधी आपण लोकांपर्यंत पोहोचायचं अशी ही योजना आहे - ठाकरे >> महाराष्ट्रातील प्रत्येक घरात महिन्यात दोन वेळा आरोग्याची चौकशी करण्यासाठी सरकारची एक टीम जाईल - ठाकरे >> ऑक्सिजन ही आरोग्य खात्याची प्राथमिकता ठरवलीय. ८० टक्के ऑक्सिजन आरोग्यासाठी वापरला जातोय - ठाकरे >> आपलं कुटुंब आपली जबाबदारी आहे. पूर्ण काळजी घ्या. सरकारही सर्व व्यवस्था करत आहे - ठाकरे >> मुख्यमंत्रिपदी असल्यामुळं कधीही काहीही करता येत नाही. महाराष्ट्र सरकार खंबीर पावलं टाकतोय - ठाकरे >> बोलत नाही याचा अर्थ माझ्याकडं उत्तर नाही असं नाही - ठाकरे >> महाराष्ट्राच्या बदनामीचा जो डाव आखला जातोय, त्याबद्दल बोलणार आहे - उद्धव ठाकरे >> 'पुनश्च हरिओम' म्हणजे पुन्हा राजकारण असा त्याचा अर्थ नाही. >> मुंबईतील करोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढतोय. ग्रामीण भागातही संसर्ग पसरतोय - उद्धव ठाकरे >> करोनाची दुसरी लाट आलेय की काय अशी वाटण्याची परिस्थिती सध्या आहे - उद्धव ठाकरे >> उद्धव ठाकरे यांचा लाइव्ह संवाद सुरू >> सुशांतसिंह राजपूत व कंगनाच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे लक्ष >> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी एक वाजता साधणार जनतेशी संवाद
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mjTnI4
via IFTTT


No comments:
Post a Comment