'...तर त्यांच्या कपाळावर खिळा ठोकावा लागेल' - Maharashtra Mazaa

Latest

Wednesday, April 15, 2020

'...तर त्यांच्या कपाळावर खिळा ठोकावा लागेल'

https://ift.tt/2xy9YDE
मुंबई: वांद्रे इथं झालेला मजुरांचा जमाव आणि त्या पाठीमागून चाललेलं राजकारण हे एक मोठं षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. 'करोना संकटाची संधी साधून कोणी राजशकट खिळखिळे करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्या कपाळावर सरकारला खिळा ठोकावा लागेल, असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. 'विरोधी पक्षानं इतक्या खाली घसरावं याचं दुःख आहे, असा सणसणीत टोलाही हाणला आहे. लॉकडाऊन झुगारून मंगळवारी मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मजुरांचा जमाव रस्त्यावर आला होता. त्यावरून मोठं वादंग माजलं आहे. विरोधकांनी सरकारवर याचं खापर फोडलं आहे. मजुरांना अन्नपाणी मिळत नसल्यानं ते रस्त्यावर उतरत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करण्यात आलंय. राज्यातील भाजप नेत्यांवरही टीका करण्यात आलीय. 'महाराष्ट्राशी व येथील लोकांशी आपले काही देणेघेणेच नाही अशा पद्धतीने विरोधी पक्ष वर्तन करीत आहे, असा अग्रलेखात म्हटलं आहे. 'मुंबईतून परराज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा रेल्वे स्थानकांवरूनही सुटतात. पुणे, नागपुरातूनही सुटतात; पण गर्दी झाली ती फक्त वांद्रे स्थानकाजवळ. काही (हिंदी) वृत्तवाहिन्यांवरही फक्त वांद्रे येथील गर्दीवर चर्चेची गुऱ्हाळे चालवली. मुंबईतील वांद्र्यात घडले तोच प्रकार मोदी-शहांच्या सुरतमध्ये घडला. पण वृत्तवाहिन्यांवरील या गुऱ्हाळांमध्ये सुरत येथे परप्रांतीय मजुरांचा जो उद्रेक झाला त्याचा साधा उल्लेखही होत नाही. हा काय प्रकार म्हणायचा,' असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याची उत्तर कोण देणार? >> १५ एप्रिलनंतरच्या तारखांसाठी रेल्वेने रिझर्व्हेशन कसे घेतले? हा अपराध आहे. वांद्र्यात जी गर्दी उसळली, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यास रेल्वे मंत्रालय जबाबदार आहे. त्याबद्दल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागणार आहेत काय? >> इतके लोक जमा होईपर्यंत पोलीस काय करीत होते? हा प्रश्न आहे. वांद्र्यातही लॉकडाऊन आहे. रस्त्यावर येणाऱ्यांच्या पार्श्वभागावर पोलीस फटके मारीतच असतात. मग दहा हजार लोकांचा जमाव जमतो कसा? नेमके याच वेळी कोणी ‘लॉक डाऊन’ उठवले होते काय? दुसरे असे की, हे लोक आपापल्या गावी जाण्यासाठीच जमले होते ना? मग त्यांच्या हाती साधी वळकटीही कशी नसावी?


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RJ15xM
via IFTTT

No comments:

Post a Comment