कोल्हापूरः बेळगावात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद पेटला आहे. पिरणवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच रातोरात संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवल्यानं बेळगावात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. संगोळी रायान्ना यांच्या पुतळ्यावरून पुन्हा एकदा बेळगावातील मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत. कन्नड संघटनांनी मध्यरात्री रायन्ना यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरचं बसवला. रायान्ना यांचा पुतळा इतरत्र हलवा अशी मागणी करत पिरणवाडी गावातील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले आहे. पिरणवाडी या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असून या चौकाला शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. या चौकात संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न काही दिवस सुरू होता. त्याला मराठी भाषिकांचा विरोध आहे. तरीही मध्यरात्री तीन ते चार वाजता शिवाजी चौकात अचानक संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसविण्यात आला. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर मराठी भाषिक आक्रमक झाले. रस्त्यावर उतरून मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी पोलिसानी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला. वाचाः गावात पुतळा बसवण्यात आपला विरोध नाही पण तो शिवाजी चौकात नको अशी भूमिका मराठी भाषिकांनी घेतली होती घेतली आहे. आहे तरीही त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी कर्नाटक सरकारने रातोरात संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसविण्यास परवानगी दिली. कन्नड भाषिकांनी रात्री तीन ते चारच्या सुमारास हा पुतळा बसवला. या पुतळ्यावरून मराठी आणि कन्नड भाषिकांमध्ये वाद सुरू झाला असून या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यामुए या भागातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून गावात समझोता घडवून पुतळा आहे त्याच ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बेळगावातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला होता. पुतळा हटवल्यानंतर मनगुत्ती गावातील गावकरी आक्रमक झाले होते. त्यासोबतच महाराष्टात कोल्हापूरसह अनेक भागांत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. स्थानिक प्रशासनाने पुतळा पुन्हा बसवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा वाद शमला होता. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gxYel7
via IFTTT


No comments:
Post a Comment